श्री. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 1 मे, 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे तर त्या कार्याची प्रगती व विकास होईल ह्या दृष्टीने पावले निश्चितपणे टाकण्यात येतील; असे आश्वासन दिले होते. त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर वेळोवेळी अनेक मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची नियुक्ती या पदावर झाली.
मंडळाचे अध्यक्ष खालील प्रमाणे –
अध्यक्ष
|
कार्यकाल
|
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
|
1960 ते 1980
|
डॉ.सुरेंद्र बारलिंगे
|
1980 ते 1989
|
प्रा. यशवंत मनोहर
|
1989 ते 1990
|
डॉ. य.दि. फडके
|
1990 ते 1995
|
श्री. विद्याधर गोखले
|
1995 ते 1996
|
डॉ. मधुकर आष्टीकर
|
1996 ते 1998
|
श्री. द.मा. मिरासदार
|
1998 ते 1999
|
श्री. सुरेश द्वादशीवार
|
2000 ते 2000
|
प्रा. रा.रं. बोराडे
|
2000 ते 2004
|
प्रा. रतनलाल सोनग्रा
|
2004 ते 2004
|
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
|
2006 ते 16 ऑगस्ट 2013
|
मा. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई तथा. मा.
अध्यक्ष, (अतिरिक्त कार्यभार), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
|
दिनांक 17/08/2013 ते 04/08/2015
|
श्री. बाबा भांड
|
05 ऑगस्ट, 2015 ते दिनांक 25 डिसेंबर,
2018
|
डॉ. सदानंद मोरे 26 डिसेंबर, 2018 पासून
|
(सदर माहिती नेटवरून साभार सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा