सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

चक्क राज्यपालांना मारली होती थप्पड...

ही घटना १९८२ ची आहे.. देवीलाल यांनी तेव्हा राज्यपाल महोदयांच्या कानफडात मारली होती.. ९० सदस्य संख्या असलेल्या हरयाणा विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक ३५ आमदार निवडून आले होते. लोकदलाचे ३१ आणि  भाजपचे ६ आमदार निवडून आले. बाकी इतर अपक्ष वगैरे. भाजपने पहिल्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला रोखण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देवीलाल यांच्या  लोकदल पक्षास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण राज्यपालांनी बहुमताची शहानिशा न करता काँग्रेसच्या भजनलाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.  ( आज काँग्रेस तेच करतेय, पण ते पाप आहे असे भक्तमंडळी म्हणतात) अपक्ष व इतर आमदारांसह देवीलाल यांनी बहुमताचा आकडा गाठून सरकार स्थापनेचा दावा केला पण 'काँग्रेसी' राज्यपालांनी त्यांचे ऐकले नाही... म्हणजे आज महाराष्ट्रात भाजपच्या राज्यपालांनी जशी परिस्थिती निर्माण केली आहे, साधारण तशीच. भाजपचे ६  लोकदलाचे ३१ आणि अपक्ष अशा बहूमताच्या ४६ हून अधिक सदस्यांसह देवीलाल यांनी राज भवन गाठले. राज्यपाल जी.डी. तापसे यांच्यासमोर पाठिंबा देणाऱ्या बहुमताच्या आकड्यासह आमदारांची परेड घडवली. बहूमत तुमच्या डोळ्यांनी बघा आणि काँग्रेसचे भजनलाल सरकार बरखास्त करा अशी विनंती देवीलाल यांनी राज्यपाल महोदयांना केली. पण राज्यपाल जी डी तापसे मान्य करायला तयार नव्हते. अखेर संयम संपला आणि संतापलेल्या देवीलाल यांनी राज्यपालांची गचांडी धरली. कॉलर सोडवण्यासाठी राज्यपालांनी हिसका मारला तसा देवीलाल यांनी सरळ राज्यपाल तापसे यांच्या थोबाडीत एक सणसणीत थप्पड ठेऊन दिली. लोकशाहीची हत्या करणाऱ्या राज्यपालांना कसा धडा शिकवायचा याचा राजमार्ग भाजप आमदारांच्या साक्षीने देवीलाल यांनी दाखवून दिला.  महाराष्ट्रातही आज तेच घडते आहे. शिवसैनिक, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम सोडावा आणि देवीलाल यांच्यासारखे पाऊल उचलावे, असे लोकशाहीच्या मारेकऱ्यांना वाटते काय..?  
*- टी. गणेशन्*
(सदर माहिती व्हाट्सआप समूहावरून)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा